Posts

खारुताईची सुटका

Image
  खारुताईची सुटका तेजोमयीच्या सदनिकेच्या सर्व गॅलरिंना नायलॉनची जाळी लावली आहे. कबुतर,उंदिर आणि पक्षी आत शिरु नये म्हणून ही खबरदारी.पण पक्षांना आणि उंदिरमामास त्याचं काय ? ते   या जाळीतून आत येण्याचा प्रयत्नच करणार नाहीत, असं आईला वाटत होतं.बाबांचं यावर काहीच मत म्हणजे चितभी मेरी आणि पटभी मेरी. म्हणजे उंदिर-कबुतर-खारुताई-इतर पक्षी येऊही शकतात किंवा नाहीही शकतात. त्यांचं असच बऱ्याचदा अधेमध्ये असायचं.   तुमचं काय ? तेजोमयीनं अलेक्झांडरला विचारलं. अलेक्झांडर हुषार आणि हिज मदर व्हाईस ना , त्यामुळे याप्रश्नावर त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. या जाळ्यांवर पक्षी आणि उंदिरमामास त्यातून आत येण्यास मनाई आहे,अशी पाटी लावली नव्हती. त्यामुळे जाळी लावल्यावर दोन तीन दिवसात पक्षांनी जाळीतून आत येण्याचा प्रयत्न सुरु केला.एका उंदिरमामाने या जाळीतली एक मोठी फट बरोबर शोधून काढून त्याने घरात प्रवेश केला.त्यावेळी त्याच्या दुर्देव्याने अलेक्झांडर समोरच होता.त्याला बघून उंदिरमामाची भीतिने गाळण उडाली.अलेक्झांडर त्याच्यावर झडप मारणार तोच उंदिरमामा शिताफीने आल्यापावली माघारी वळले आणि...

अलेक्झांडरचा विमा?

Image
  अलेक्झांडरचा विमा ? तेजोमयीच्या घरी पहिल्यांदाच एक अनोळखी गृहस्थ आले. बाबा त्यांना ओळखत असावे. पण आई,तेजोमयी आणि अलेक्झांडर- द-डॉगीने त्यांना बघण्याचा प्रश्नच नव्हता. पहिल्यांद्याच घरी आलेल्या या व्यक्तीचं,अलेक्झांडरने त्याच्या पध्दतीने स्वागत केले.मात्र बाबांनी त्याला समजावून सांगितल्यावर त्याचं गुरगुरण कमी झालं.बाबांनी त्याला आत पाठवलं.त्यांनी आईला हॉलमध्ये बोलावलं. घरी आलेल्या गृहस्थांचं नाव होतं,अजित पांडे.ते आरोग्य विमा एजंट होते.बाबांनी त्यांची आईला ओळख करुन दिली.आईने त्यांना नमस्कार केला आणि चहा आणते म्हणून आत गेली.थोड्यावेळाने आई चहा घेऊन खोलित आली.आई एखाद्याला चहापाणी स्वत: देते म्हणजे,त्या व्यक्तीवर गुरगारयचं नाही,भुंकयाचं नाही,हे   अलेक्झांडरला बरोबर कळलं होतं.त्यामुळे तो आईसोबत हॉलमध्ये आला.पांडे यांच्या पायाभोवती घुटमळून पुन्हा आत निघून गेला. प्रारंभी किंचित दचकलेले पांडे ,अलेक्झांडरच्या प्रेमळ बघण्याने विरघळून गेला.फारच गोड आहे हो तुमचा कुत्रा..असं ते बोलून गेले. कुत्रा नाही . अलेक्झांडर ! बाबा म्हणाले. आमचा लेक.तेजोमयीचा भाऊ,आई लगेच म्हणाली.तिला आपली...

कोंबडी आणि शेतकरी

Image
कोंबडी आणि शेतकरी गणपत शेतकऱ्यास दोन मुलं होते.त्या दोघांनांही त्याने लहानपणापासून शेतात श्रम करण्याचे शिकवले होते.दोघेही आनंदाने ते काम करत.दिवसभर राबत.संध्याकाळी शेतातील विहिरीवर आंघोळ करुन ते घरी परत.घराच्या वाटेवर देवीचे मंदिर होते.त्या ठिकाणी जात आणि मनोभावे देवीला नमन करत. मात्र ते दोघेही देवीकडे काही मागत नसत. याचं देवीला खूप आश्चर्य वाटे.त्यामुळे एके दिवशी देवी त्यांच्यासमोर प्रगट झाली.देवीला आपल्यासमोर बघून दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला.त्यांनी देवीला दंडवत घातला. देवी प्रसन्न होऊन त्यांना म्हणाली, तुम्ही माझ्या मंदिरात दररोज येता.इतरही भक्त येतात.ते काहीना काही मला मागत असतात.पण तुम्ही मात्र मला काहीच मागत नाही. देवी माते,तू आम्हाला दररो शेतात कष्ट करण्याची शक्ती देतेस,तीच पुरेशी नाही का ? त्यापेक्षा आणखी काय हवे.आमच्या कष्टाच्या घामामुळे शेतीत भरपूर पीक येतं.शेतातललं पिकं म्हणजेच तुझा आशीर्वाद.त्यामुळे आम्ही तुला काही मागत नाही.दोन्ही भाऊ म्हणाले.या उत्तराने देवी खुष झाली. तुम्ही स्वत:हून मागत नाही म्हणून मी आज तुम्हाला स्वत: भेट देणार आहे.देवी म्हणाली. नक...

तोतया वाघोबा?

Image
  तोतया वाघोबा ?   एकदा वननगरीत वाघोबा आणि त्यांची दोन मुलं रमतगमत चालली होती.फिरता फिरता त्यांना एक तलाव लागला.त्या तलावाभोवती सर्वत्र झाडं होती.तलावातील वनस्पतींना सुंदर सुंदर फुल लागली होती.तलावात बदक आणि दुसरे पक्षी छान विहार करत होते.तलावाच्या भोवती असणारी झाडे फलं-फळांनी लदबदून गेली होती.त्यांचा मोहक सुगंध सर्वत्र दरवळत होता.त्या झाडांवर माकडं इकडून तिकडे उड्या मारुन खेळत होती.वेगवेगळे पक्षी झाडांवर निवांत बसले होते.काही पक्षी डुलक्या घेत होते काही फळं-फुलं खान्यात मग्न होते.काही पक्षी गात होते.असे ते प्रसन्न वातावरण बघून वाघोबास तिथे काही क्षण थांबण्याची इच्छा झाली.त्याने दोन्ही बछड्यांना तसं बोलून दाखवलं.त्यांनाही तहान लागलीच होती.ते लगेच हो म्हणाले. तिघांनीही आधी तलावाचे चवदार पाणी प्राशन केले. ते गोड पाणी पिऊन तिघांची तहान शांत झाली.पाणी प्याल्यानंतर ते तिघेही एका मोठ्या डेरेदार वृक्षाच्या सावलीत येऊन बसले.त्या सावलीत वाघोबांना थोड्यावेळाने झोप आली.वाघोबा झोपल्याचे बघून दोन्ही बछडे खेळू लागले.त्या झाडावर काही माकडं आणि त्यांची पिल्लं दंगामस्ती करत होती.वाघोबांच...

अर्धे राज्य द्या!

Image
  अर्धे राज्य द्या ! सिंह महाराजांच्या कोणत्यातरी पूर्वजांना एका उंदराने शिकाऱ्याच्या जाळयातून मुक्त करुन वाचवले होते.याची कथा उंदरांच्या प्रत्येक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चविने पोहचवली जायची.काही पिढीतील उंदरांना त्याचे काही फार कौतुक वाटले नाही.पण सध्याच्या पिढीतील एका उंदरास या गोष्टीचा फारच अभिमान वाटला. सिंहमहाराजांना तेव्हा आपल्या पूर्वजाने वाचवले नसते तर महाराजांचे राज्य नष्ट झाले असते.कुणाच्या तरी ताब्यात गेले असते.आपल्या पूर्वजाने सिंहमहाराजांचे प्राण वाचवून सिंह कुळावर मोठेच उपकार केले आहेत,अशी त्याची भावना होती. त्याने ही भावना सध्याच्या काळातील काही ज्येष्ठ उंदरांना सांगितली.त्यापैकी एक ज्येष्ठ उंदीर हसला. अशी भावना ठेवणं म्हणजे मूर्खपणाचा कळस   असल्याचं तो म्हणाला. दुसरा ज्येष्ठ उंदीर म्हणाला, आपल्या पूर्वजाने उपकार केल्याचा भावनेने, सिंहमहाराजांना नक्कीच वाचवले नसणार. कुणीही संकटात असेल तर जमेल तेवढी आपण मदत केली पाहिजे,या सद्गुणाचा त्या पूर्वजाला त्याक्षणी आठवण झाल्यानेच त्याने सिंहमहाराजांना मदत केली असली पाहिजे. अहो आजोबा,या सद्गुणाची काय जाण ठेवली...

हावरटपणाची शिक्षा

Image
  हावरटपणाची शिक्षा एकदा एका   कावळोबा आणि कबुतराची मैत्री झाली.या कबुतराने भगवान हलवायच्या स्वयंपाक खोलित घरटं बांधलं होतं.भगवान हलवाई वृध्द होता. तो सर्वांशी प्रेमाने वागायचा.विशेषत: पक्षांवर त्याचे विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्याने कबुतरला हाकलून लावलं नाही. भगवान त्याला दररोजच्या स्वयंपाकातलं खायला द्यायचा.त्यामुळे कबुतराला दररोज मेजवाणी मिळायची. आपण आपल्या मित्रालाही मेजवाणी द्यायला हवी,असं एकदा कबुतराला वाटलं. त्यामुळे तो कावळयाला घेउुन हलवायाच्या घरी आला.हलवाई प्रेमळ असल्याने त्याने कावळ्यालाही खायला दिलं. असं ताजं आणि वेगळं अन्न मिळाल्याने कावळा खूप आनंदी झाला.त्याने   कबुतराचे आभार माणले.कबुतर त्याला दररोजच हलवायाच्या घरी येण्याचा आग्रह करु लागला.हा आग्रह कावळ्याच्या मोडवेना.बरेच दिवस तो कबुतरासोबत हलवायाच्या घरी जात राहिला.मात्र एके दिवशी त्याने कबुतराला हलवायाच्या घरी येण्यास नकार दिला.कबुतराला आश्चर्य वाटले. तेव्हा कावळ्याने आपल्या पूर्वजाच्या हावरटपणाची गोष्ट त्याला सांगितली. खूप खूप वर्षापूर्वी अशाच एका हलवायाच्या घरी राहणाऱ्या कबुतरासोबत कावळयाने मै...