खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं?
खोटं खोटं खरं की खरं खरं खोटं ? कल्याणी, तेजोमयी, टिल्लू, पिल्लू, टिनी, प्रदीप ही टोळी परवा मारोतीरायाच्या मंदिरात जमली. मारुतीरांना नमन झालं त्यांनी गदा हलवून आशीर्वाद दिल्याची खात्री केल्यावर सर्व मंडळी मंदिरातील बाकड्यांवर जाऊन बसले. गदा हलवून आशीर्वादाची खात्री मारुतीराया स्वत: करत नसत. टोळीतल्या तेजोमयीस तसा प्रत्येक वेळी भास होतो, असं तिचं म्हणणं. तिने टोळीला सांगितलं की त्यांचं समाधान व्हायचं. मारुतीराया गदा हलवून आशीर्वाद देतात आणि तेजोमयी जे सांगत ते सत्यच यावर टोळीचा शंभर टक्के विश्वास असल्याने, कधी कुणी यावर प्रश्न ब्रिश्न विचारले नाहीत. तर, आज टोळी बाकड्यांवर बसल्यावर प्रदीप अचानक बोलून गेला, आपण खरोखरच खोटं बोलत नाही का राव, याचा शोध घेतला पाहिजे.. म्हणजे ? टोळितील इतर सदस्य एकमुखाने म्हणाले. पदोबा, तुझ्या डोक्यात काहीबाही येत बाँ.टिल्लू म्हणाला. काही येतं, पण बाही येत नाही.प्रदीप मख्ख चेहऱ्यानं म्हणाला. काहीही हं,पद्या. तेजेामयी म्हणाली. अरे, विनोद बाजूला ठेवा, पदोबा म्हणतो त्यावर विचार करायला का हरकत आहे. आपण खरच खोटं बोलत नाही का ? कल्याणी म्हणा...