बैलौबा कां भितो?
बैलौबा कां भितो ? जाधवपुरच्या महाराजांनी उभारलेल्या सुंदर अशा बागेत, वानरांची टोळी खेळत बागडत होती. या टोळीमधील ज्येष्ठ सदस्य वेगवेगळया झाडांवर शांतपणे फळे खात बसली होती. पिल्लू वानर मंडळी मात्र दंगामस्तीत रंगली होती. या झाडावरुन त्या झाडावर उड्या मार. या फांदीला लटक, त्या फांदिला लटक. मध्येच आईला जाऊन बिलग. मध्येच जमिनीवर येऊन बागेतल्या नळाच्या तोटीवर जाऊन बस. थोडक्यात सर्वांची धम्माल सुरु होती. त्यांच्या या धम्मालीकडे आईबाबा कौतुकाने बघत होते. ही मौजमस्ती सुरु असताना या बागेत एक बैलोबा कुठून तरी आला. ज्या ठिकाणी पिल्लू वानरांची धम्माल सुरु होती, तिथून तो जाऊ लागताच सर्व वानरांमध्ये हलचल माजली. ते पटापट पटापट इकडे तिकडे पळाले. त्या वानरांना पळताना बघून तो बैलोबाही पळू लागला.. या सर्व घटनाक्रमाकडे एक पिल्लू वानर न घाबरता, लक्ष ठेऊन होतं. बैलोबा निघून गेल्यावर त्याने आपल्या आईबाबांना विचारलं, बैलोबा दिसताच तुम्ही काका काकू काकू, मामा-मामी, आत्या, ताई, दादा, आजी आजोबा, माझे मित्र कां बरे पळालात ? अरे, तो बैलोबा, बघितलास ना, कसा आडदांड होता. त्याने त्याची शेपटी फिरवली तरी...