Posts

निंदानालस्ती

Image
  निंदानालस्ती एका तलावाच्या काठी असलेल्या झाडाच्या आडोशाला अनेक पक्षी येत. दिवसभर त्यांची दंगामस्ती चाले. इकडून तिकडे उड्या मारायला या पक्षांना खूप आवडत असे. एकही पक्षी फार काळ एखाद्या ठिकाणी स्वस्थ बसत नसे. एका फांदीवरुन दुसऱ्या आणि दुसरीवरुन तिसऱ्या आणि मग लगेच पंख फैलावून आकाशात सूर मारणार, सभोवताली चक्कर मारली की पुन्हा झाडांच्या फांद्यावर येऊन बसणार. पुन्हा काही वेळाने हाच खेळ नव्याने सुरु. अशा या तलावाच्या ठिकाणी काही बगळे उडत उडत येत.  तलावातली बसण्यासारखी एखादी जागा ते बघत आणि त्यावर तासनतास बसून राहत. क्वचितच ते या जागेवरुन त्या जागेवर जात किंवा काही दूर उडून येत. इतर पक्षांसारखं मात्र सारखे उडणे बसणे, पुन्हा उडणे असं काही ते करत नसत. इतर पक्षांना याचं फार आश्चर्य वाटायचं. एकदा पक्षांची सभा भरली .त्यात कावळा, पोपट, चिमणी, टिटवी, कोकीळ, कोकिळा, कबुतर, निळकंठ इत्यादी पक्षी होते. ते सर्वजण तलावतील एका जागेवर बसलेल्या बगळयाबद्दल चर्चा करु लागले. हा बगळोबा फारच आळशी दिसतो बुवा.कावळा म्हणाला. उडता येत असूनही फार उडत नाही. मख्ख बसून राहतो दिवसेंदिवस एकाच ठिकाणी....

आई रागावते तेव्हा...

Image
  आई रागावते तेव्हा... वाघीणकाकूस आपल्या दोन्ही बाळांचा फार अभिमान होता. त्यातले कुमार वाघोबा हे जरा जास्त चपळ होते. त्यामानाने वाघीण काकुंची मुलगी, ही जरा सुस्त होती. पण हळूहळू आपल्या सारखी शूर आणि कोणत्याही संकटाला न भिणारी होईल याची खात्री काकुंना होती. ती दररोज दोघांना, जंगलात कसं वागायचं ? कसं फिरायचं ? शिकार कशी करायची ? संकटाची चाहूल कशी ओळखायची ? संकटं आलं तरी न घाबरता स्वत:ची सुटका कशी करुन घ्यायची ? इतर प्राण्यांवर कसा वचक ठेवायचा ? अशा कित्येक गोष्टी समजावून सांगायची. कुमारा वाघोबांना या गोष्टी भराभर जमू लागल्या होत्या. पण काकुंची मुलगी मात्र मागे मागेच राहायची. कधी प्रेमाने तर कधी रागावून वाघीण काकू तिला धडे द्यायची. आई आणि दादा असताना आपणास कुणाची भीती कां वाटावी ? असं मुलीला वाटायचं. कुमार वाघोबाची प्रगती होत असताना, काकुंच्या मुलीचं अडखळणं सुरुच होतं. काकुंना जरा काळजीच वाटू लागली. मात्र हळूहळू तीही कुमार वाघोबासारखीच चपळ आणि हुषार,न भिणारी बनेल अशी काकूंना खात्री होती. एकदा, कुमार वाघोबा आणि काकूंची मुलगी जरा निवांत झोपले होते. ते सुरक्षित आहे असं बघून काकू ...

अनाठायी भीती

Image
  अनाठायी भीती वननगरीच्या खूप आतमध्ये गोड्या पाण्याचा एक तलाव होता. त्याच्या अवतीभवती सुंदर फुले झाडे होती. गोड आणि मधूर फळांची झाडे होती. पण तिकडे जाण्याची हिम्मत हरणांना होईना. कारण त्यांच्या कानावर आलं होतं की, तिथे गेलं की तिथे दडून बसलेले कोल्हा, अस्वल, कुत्रे हल्ले करुन हरणांना खाऊन टाकतात. तिथे म्हणे फक्त भूतच जाऊ शकतात. तिथे दुसरे कुणी गेलं तर ती भूतं त्या प्राण्याला उचलून नेतात आणि तलावाच्या पाण्यात ढकलून देतात. तिथे फक्त वननगरीच्या महाराजांनाच जाण्याची परवानगी आहे. दुसरं कुणी गेलं, तर वनदेवता नाराज होऊन त्याला शाप देते. अशी ती वेगवेगळी कारणं होती. पण आई, एका पाडसाने एकदा आईला विचारलं, हे कधी प्रत्यक्ष घडल्याचं आपल्या हरण काका-काकू-मामा-मामी-दादा-ताई-आजी-आजोबा यांनी प्रत्यक्ष बघितलंय का ? याचं उत्तर काही हरण आईस देता आलं नाही. यावर ते पाडस म्हणाले, आपण जाऊन यायचं का गं,तिथे ? म्हणजे खरं काय ते कळेल ना. अरे बाबा, नको नको.. कशाला सुखाचा जीव संकटात टाकायचा म्हणते मी, आई पाडसाला म्हणाली. अगं कशाला घाबरतेस तू ? आपल्या पायात किती शक्ती आहे. आपल्या इतक्या वेगाने कुणी...

मूर्ख नागराज..

Image
  मूर्ख नागराज.. नागराजांनी खूप दिवसांनी खास दरबार बोलावला. त्यामुळे झाडून सर्व दरबारी हजर झाले. विशेष काही कारण असेल तरच नागराज असा दरबार बोलावत असत. त्यामुळे नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असल्याचा अंदाज सर्व दरबाऱ्यांना आला. नागराजांचे आगमन झाले.सर्वांनी त्यांना अभिवादन केले. ते आसनस्थ होताच त्यांनी दरबाराची कार्यवाही सुरु केली. प्रधानजींना त्यांनी निवेदन करावयास सांगितलं. पण प्रधानजींना काहीच ठाऊक नव्हतं. त्यांना फक्त विशेष दरबार   बोलवण्याचा आदेश आला होता. त्याची त्यांनी अंमलबजावणी केली होती. त्यामुळे ते मान खाली घालून उभे राहिले. नागराजांच्या मनातलं कस बरं कळणार आपणास ? असं त्यांना बोलावं वाटलं पण,नागरजांच्या समोर तोंड उघडण्याची त्यांची टाप नव्हती. प्रधानजींची चांगलीच जिरली म्हणून इतर दरबारी मनातून आनंदून गेले होते. एका दरबाऱ्यास तर प्रधानाची नागराजांनी हकालपट्टी केली असून आपणास प्रधानांची वस्त्रे परिधान केल्याचे स्वप्न दरबारातच पडले. त्याला याचे हसू आले.नागराजांच्या नजरेतून ही बाब कशी बरी निसटणार ? त्यांनी त्या दरबाऱ्यास चांगलं खडसावून बाहेर हाकलून लावलं.जे पद ...

ससा आणि बेडूक

Image
  ससा आणि बेडूक एकदा एक ससोबा नदीजवळील मऊशार गवत खात असताना, नदिच्या पाण्यातून काही बेडकं बाहेर आलीत. इकडे तिकडे बघत असताना त्यांना ससा दिसला. त्याबरोबर त्यातील एक बेडूक सोडून इतरांनी पाण्यात उड्या घेतल्या. क्षणार्धात ते दिसेनासे झाले. हे सर्व ससा बघत होता. आपण दिसल्याबरोबर फक्त एक सोडून सर्वांनी पाण्यात कां बरं उड्या मारल्या असतील ? आपली भीती वाटली असेल का त्या सर्वांना ? मग या बेडकाला कां बरं वाटली नसेल भीती ? असे प्रश्न सशाच्या मनात निर्माण झाले. आपल्या मनातील शंका त्या बेडकास विचारावी असं ससोबास वाटलं. पण विचारायचं कसं हा प्रश्न होता. आपण त्याच्याकडे गेलो तर तोही पाण्यात उडी मारुन निघून जायचा. ससा मनात म्हणाला. तो विचार करत बेडकाकडे एकटक बघत राहिला. बेडूकही सशाकडे एकटक बघत होता. हा ससा आपल्यावर हल्ला करेल म्हणून आपले सवंगडी लगेच माघारी निघून गेले. पण इतका वेळ होउुनही हा ससा जागचा हलला नाही. आपल्यावर हल्ला करण्याचे कोणतीही हालचाल त्याच्याकडून घडत नाही. आम्ही समजत होतो तसं हा भीतीदायक दिसत नाही. खरच असं असेल का ? असा विचार करत बेडूक सशाकडे एकटक बघत होता. असा बराच ...